निर्भीडसत्ता न्यूज –
आर्थिक परिस्थिती बेताची असणा-या सर्वसाधारण कुटूंबातून आलेले विद्यार्थी देखील योग्यं शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशाची शिखरे पादाक्रांत करु शकतात. मागील दहा वर्षांत विविध स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होणा-यांमध्ये ग्रामिण भागातील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढता आहे. यात शिक्षकांचे योगदान महत्वपुर्ण आहे. असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुधाकर जाधवर यांनी केले.
भगवान सेना पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने दहावी बारावीतील शंभर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी (दि.16 जुलै) आचार्य अत्रे सभागृह येथे प्रा. जाधवर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, एसएससी बोर्डाचे सचिव प्रा. बी. के. दहिफळे, जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी सुधाकर पाखरे, उदयोजक आबा नागरगोजे, नगरसेवक केशव घोळवे, नगरसेविका योगिता नागरगोजे, भगवानसेनेचे अध्यक्ष सुभाष दराडे आदींसह पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रा. डॉ. जाधवर म्हणाले सध्याची तरुण पिढी ‘गॅझेट’मध्ये गुरफटून जात असल्याने त्यांचा पालकांशी, मित्र, मैत्रिणींशी व शिक्षकांशी संवाद दुरावत आहे. यामुळे मुलांच्या स्वभावात व वर्तणुकीत लक्षणीय बदल घडत आहे. मुलांना प्रेरणा देऊ शकेल असे साहित्य पालकांनी व शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाव्दारे या गॅझेट मधून दिले पाहिजे. मुलांना योग्य वयात जबाबदारीची जाणीव करुन द्यावी. योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांना कोणतेही ध्येय साध्य होऊ शकते. त्यांना परिस्थितीची जाणीव करून देणे हे पालकांचे काम आहे. तसेच पालकांनी देखील जबाबदारीने वागले पाहिजे. असे प्रा. जाधवर यांनी सांगितले.
यावेळी प्रा. बी. के. दहिफळे, सदाशिव खाडे, आबा नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गणेश ढाकणे, जयप्रकाश दहिफळे, दिपक नागरगोजे, काका मुंडे, किसन केंद्रे, विकास अघाव, प्रसाद खेडकर, अमोल जायभाये, आदिनाथ माळवे, बबन गर्जे, गोविंद इप्पर, अरुण गिते, समीर खाडे, अनिल जायभाये, पांडुरंग फुंदे, खंडू खेडकर, अमोल नागरगोजे, अरुण घोळवे, रामदास कावळे, एस.एस.नाकाडे, ज्ञानेश्वर नागरगोजे, रवी बांगर, तुकाराम बांगर, मच्छिंद्र गिते, विठ्ठल नागरगोजे, नितिन खाडे, राहुल नागरगोजे, गणेश खाडे, संभाजी नागरगोजे, गजानन सोनुने, हौसराज सानप, भागवत खेडकर यांनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक गणेश ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन शांतीलाल दहिफळे व सुप्रिया पांडे तर आभार जयप्रकाश दहिफळे यांनी मानले.