निर्भीडसत्ता न्यूज –
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी प्रारूप नियमावली प्रसिद्ध केली. नियमितीकरणाची ही प्रक्रिया पूर्ण होपर्यंत रिंगरोड बाधितांची घरे पाडता येणार नाहीत. त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने हा लढा सुरु ठेवा, असे मत ज्येष्ठ वकील व विधीतज्ञ राजाभाऊ सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने आकुर्डी येथील वाल्हेकरवाडी रोडवर रिंगरोड बाधितांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सचिन चिंचवडे, करूणा चिंचवडे, नामदेव ढाके, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, भगवान वाल्हेकर, समितीचे समन्वयक विजय पाटील प्रकाश बाबर, रघुनाथ वाघ, शिवाजी शेडगे, राजेंद्र चिंचवडे, दत्ता चिंचवडे, जितेंद्र पाटील, सुरेखा लांडगे, शेखर चिंचवडे, धनाजी हेळवर, अमर आदियाल, संदीप चिंचवडे, राजन सुर्यवंशी, पिंटु जवळकर, अशोक ढवण, शुभांगी चिघळीकर, आशाताई लांडगे आदी उपस्थित होते.
विजय पाटील म्हणाले, आंदोलनाला नियामावलीमुळे अंशतः यश आले आहे, परंतु जोपर्यंत प्रशासन अनधिकृत घरांचा प्रश्न पुर्ण मार्गी लावत नाही, नियमितीकरणाची प्रक्रिया सहज सुलभ करून प्राधिकरण प्रशासन स्पष्ट भुमिका मांडत नाही. तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. समितीने सुचविलेल्या सुचनांचा गांभीर्याने विचार करून दाट लोकवस्तीतील रिंगरोड पर्यायी व्यवस्थेत वळवावा. तसेच, एकही घर न पाडता नाममात्र दंड शुल्क आकारून सर्व घरे शासनाने नियमित करावीत.
मानव कांबळे म्हणाले, लोकप्रतिनिधींनी सामाजिक बांधिलकी जपुन त्वरित रिंग रोड बाधितांसाठी विशेष सर्वसाधारण सभा महापालिकेत बोलवावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना येथील पूर्ण परिस्थितीचा आढावा द्यावा आणि अनधिकृत घरे नियमित कशी होतील ह्याकडे आता गांभीर्याने पहावे. तसेच, मारुती भापकर, अशोक ढवण, नगरसेवक नामदेव ढाके, शुभांगी चिघळीकर, आशा लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले.
घर बचाव संघर्ष समितीचे रेखा भोळे, रजनी पाटील, नेहा चिघळीकर, सागर बाविस्कर, अमोल हेळवर, गोपाळ बिरारी, शिवाजी इबितदार, अमोल पाटील, शैलेश बाविस्कर, राजेंद्र देवकर, निकिता पाटील, भाऊसाहेब पाटील, आबा रजपुत, दत्ता गायकवाड, रोहिणी लांडगे, आफरिन मुजावर, आबा सोनवणे, सुनिल पवार, रुपाली महाजन, गणेश सरकटे, राजू पवार यांनी संयोजन केले.