निर्भीडसत्ता न्यूज –
देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू यांची निवड झाली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत ‘रालोआ’चे उमेदवार नायडू यांनी काँग्रेसप्रणित ‘यूपीए’चे उमेदवार गोपाळकृष्ण गांधींचा पराभव केला. नायडू यांच्या पारड्यात ५१६ मते पडली, तर गोपाळकृष्ण गांधी यांना २४४ मते मिळाली. या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी नायडू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही नायडू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही ट्विटरवरून नायडू यांचे अभिनंदन केले आहे.
नायडू यांच्या निवडीने फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही नायडू यांना उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.