विनोद पाटील
सैनिक टाकळी – (प्रतिनिधी)
निर्भीडसत्ता न्यूज –
शिरोळ तालुक्यातील शेतक-यांच्या उसाला इतरांच्या बरोबरीने दर देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सक्षम असून त्या माध्यमातून वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार असल्याचे प्रतिपादन कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट मृत्यूंजय शिंदे यांनी शेती विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन व्यक्त केले.
कंपनीचे संचालक जितेंद्र धारू, शरद मोरे, अमोल शिंदे,कृषी अधिकारी सदानंद पाटील, मोहन पवार, अग्रो ओव्हरसिअरचे अनिरुद्ध पाटील, दिगंबर माने, उपसरपंच रणजित पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील, सैनिक समाजकल्याण मंडळाचे अध्यक्ष बी एस पाटील, माजी उपसभापती सुशील कांबळे, भाऊसो चौगले, टाकळीवाडीचे उपसरपंच बाबासाहेब गोरे, बाजीराव गोरे यांच्यासह सर्व तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या वेळी उपस्थित होते.
कारखान्याची मागील उसाची बिले सन २०१५ ते १६ व २०१६ ची थकबाकी बिले कंपनीने पूर्ण अदा केलेली आहेत तसेच कामगारांचीही थकित पगार भागवले असून या कामगारांच्या मध्ये समाधान व्यक्त होत आहे. आता पर्यंत कारखान्याकडे एकूण चाळीस हजार एकराची नोंद झाली असून त्यापैकी शिरोळ तालुक्यातून पाच हजार एकरांची नोंद झाली आहे. ऊस विकास योजनेचा शेतक-यांनी फायदा घ्यावा यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत .जास्ती जास्त शेतकर्यांनी उसाची नोंद करून सहकार्य करावे असे आवाहन या वेळी करण्यात आले .