कोल्हापुर / प्रतिनिधी
राज्यभरातील ५८ भव्य मोर्चानंतरही मराठा समाजाची शासनाकडून दिशाभूल करण्यापलीकडे काही केले नसल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी व्यक्त केले. ते कोल्हापुर येथिल शाहू स्मारक भवन येथे आयोजित मराठा जागृती मेळाव्यात बोलत होते.
आमदार सतेज पाटील आमदार राजेश क्षीरसागर यांनी मनोगते व्यक्त केली. मेळाव्यास शैलजा भोसले प्राध्यापक विद्या साळोखे. डॉक्टर संदीप पाटील. अडव्होकेट गुलाबराव घोरपडे सुनिल पाटील . डॉक्टर प्रदीप पाटील .व्ही के पाटील उत्तम जाधव आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
कोल्हापूर येथे मराठा क्रांती मोर्चाला एक वर्ष पूर्ण झाल्याने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. येत्या दोन महिन्यांत सरकारने आश्वासनाची पूर्तता केली नाही तर आंदोलनाविषयी ची पुढील दिशा ठरवली जाईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.