निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवडचे पाणी आरक्षण रद्द झाल्याचे चुकीचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यांना त्यांच्या सल्लागारांनी चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांचे सल्लागार बदलावेत, असा आरोप सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला.
पिंपरी-चिंचवडचे पाणी आरक्षण रद्द झाल्याचे चुकीचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यांना त्यांच्या सल्लागारांनी चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांचे सल्लागार बदलावेत, असा आरोप सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला.
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनानंतर अजित पवार यांनी भाजप सत्ताधा-यांच्या दुर्लक्षामुळे पिंपरी-चिंचवडचे पाणी आरक्षण रद्द झाल्याचा आरोप केला. मात्र, हा आरोप चुकीचा असल्याचे एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना निदर्शनास आणून दिले.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी आरक्षणासाठीच्या कराराचे नुतनीकरण झाले नव्हते. शासनाच्या सुचनेप्रमाणे नुतनीकरणाची कार्यवाही महापालिकेने पुर्ण केली आहे. त्यामुळे पाण्याचे आरक्षण रद्द झालेले नाही. अजित पवारांना त्यांच्या सल्लागार चुकीची माहिती देत असल्याचा आरोप एकनाथ पवार यांनी केला.