निर्भीडसत्ता न्यूज –
चांगल्या-वाईटावर नजर ठेवून समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या पत्रकारांवर मोठी सामाजिक जबाबदारी असते. चांगल्याची भलावण करणं आणि वाईटांचे कान टोचण्याचेही काम पत्रकारांना करावे लागते या मुळेच समाजाच्या आणि तालुक्याच्या विकासात पत्रकारांचे योगदान मोलाचे असते असे म्हणावे लागेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्त जावली तालुक्यातील पत्रकारांचा गौरव विविध शासकीय विभागाच्या वतीने करण्यात आला. त्या कार्यक्रमात मानकुमरे बोलत होते. यावेळी वृत्तपत्र श्रुष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जामभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सभापती अरुणा शिर्के,जि प सदस्य दीपक पवार, नायब तहसिलदार शिरीष सपकाळ, पं स सदस्य विजय सुतार, सौ.कांताबाई सुतार, सौ. जयश्री गिरी, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सपोनि जीवन माने, नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश गायकवाड व तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे खाते प्रमुख, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मानकुमरे म्हणाले की, आता सोशल मिडियाचा जमाना आहे पण त्यातही प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आपले स्थान भक्कम पणे टिकवून आहे सोशल मीडिया कितीही स्ट्रॉंग झाली तरीही वृत्तपत्रांचे समाजातील महत्व कधीही कमी होणार नाही. राजकीय आणि सामाजिक जीवनात आमच्यासारखे कार्यकर्ते काम करत असताना आम्हाला पत्रकारांचे मोलाचे सहकार्य लाभते. समाजाच्या विकासातील पत्रकार हा महातवाचा घटक असल्याचे मानकुमरे म्हणाले.
विश्वनाथ धनावडे यांनी पत्रकार हा समाज घडविण्यासाठी महत्वाचा घटक असून अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे काम करीत असतात असे सांगितले.
जि प सदस्य दीपक पवार, सभापती अरुणा शिर्के, सपोनि जीवन माने, पत्रकारांच्या वतीने अध्यक्ष संजय दळवी, सुरेश पार्टे, शशिकांत गुरव, सूर्यकांत जोशी, इम्तियाज मुजावरयांनी मनोगत व्यक्त केले.
तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या वतीने यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय दळवी व पत्रकार सुरेश पार्टे, शशिकांत गुरव, सूर्यकांत जोशी, विजय सपकाळ, इम्तियाज मुजावर, आनंद गाडगीळ, सोमनाथ साखरे, भास्कर धनावडे, सूर्यकांत पवार, नारायण जाधव, शहाजी गुजर, रघुनाथ पार्टे, प्रशांत गुजर, धनंजय गोरे, दत्तात्रय पवार यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान शिवसेना तालुका प्रमुख विश्वनाथ धनावडे, नगरसेवक सतिश पंडीत, नगर सेविका सौ. तांबोळी, कुमारी गौरी पवार, संजय सूर्वे, सचिन जवळ, सचिन करंजेकर, मुख्याधिकारी महेश गायकवाड आदी शिवसैनिकांच्या वतीने सर्व पत्रकांचा सन्मान नगरपंचायत येथे करण्यात आला.