निर्भीडसत्ता न्यूज –
निपाह या व्हायरसमुळे सध्या केरळ राज्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या अज्ञात इन्फेक्शनमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संस्थेने निपाह व्हायरसमुळे हाय अलर्ट घोषित केला आहे. पुण्यातील नॅशनल इंस्टिस्ट्युड ऑफ वायरॉलॉजीने ३ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर निपाह व्हायरस असल्याची घोषणा केली आहे.
निपाह व्हायरस काय आहे?
-या व्हायरसची निर्मिती अत्यंत सहज होते. प्राणी आणि माणसांमध्ये हा गंभीर आजार जन्म घेतो.
-हा व्हायरस वटवागुळात असतो.
-१९९८ मध्ये मलेशियाच्या कम्पंग सुंगाई निपाहमधून या व्हायरसचा शोध लागला होता. तेच नाव या व्हायरसला देण्यात आले.
-२००४ मध्ये बांग्लादेशातून काही लोकांना या व्हायरसची लागण झाली.
-सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अंड प्रिव्हेंशन (CDC)नुसार, निपाह व्हायरसचे इंफेक्शन एंसेफ्लाइटिसशी संबंधित आहे. त्यामुळे मेंदूचे नुकसान होते.
-मनिपाल यूनिवर्सिटी इपीडेमियोलॉजी विभागानुसार. निपाह व्हायरस लाळेतून पसरतो. निपाह व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीपासून दूर रहा. तसंच प्राण्यांकडून माणसांकडेही हा व्हायरस अतिशय सहज पसरतो.
काय आहेत लक्षणं?
-३ ते १४ दिवसांपर्यंत ताप आणि डोकेदुखी.
-२४-४८ तासांत व्यक्ती कोमात जाते.
-इंफेक्शनच्या सुरुवातीच्या काळात श्वास घेण्यासही त्रास होतो.
-न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होते.
-अंगदुखी.
काय काळजी घ्याल?
-झाडावरुन पडलेली आणि खूप पिकलेली फळे खावू नका.
-या व्हायरसने पिडीत व्यक्तींच्या जवळ जावू नका.
-खूप ताप येत असल्यास डॉक्टरांची भेट घ्या.