निर्भीडसत्ता न्यूज –
महाराष्ट्रातील २० आमदार पंचायत राज समितीच्या कामासाठी अनंतनाग येथे गेले असताना त्यापैकी पाच आमदारांच्या गाडीवर अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यात विक्रम काळे, सुधीर पारवे, दीपक चव्हाण आणि किशोरअप्पा पाटील या पाच आमदारांचा समावेश असून आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हा हल्ला झाला. हे पाचही आमदार या हल्ल्यातून बाल बाल बचावले आहेत.
शिक्षक आमदार विक्रम काळे, तुकाराम काते, किशोर पाटील, सुधीर चव्हाण आणि सुधीर पारवे हे पाचही आमदार अनंतनागच्या बिजबिहारी येथून जात होते. यावेळी हल्ल्यातून वाचलेल्या आमदारांना टायर फुटल्याचा आवाज आला. मात्र हा ग्रेनेड हल्ला अतिरेक्यांकडून करण्यात आला असल्याचे आमदारांच्या लक्षात आले. या पाचही आमदारांची सुखरूप सुटका झाल्यानंतर त्यांनी श्रीनगरमधील विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन संबंधित माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सुरक्षा देण्यात आली आहे. काश्मीर येथे पंचायत राज समितीच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातील पाच आमदारांवर अतिरेक्यांनी जोरदार हल्ला केला. मात्र सुदैवाने हे पाचही आमदार अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यातून बचावले आहेत.
किशोर आप्पा पाटील- शिवसेना- पाचोरा (जळगाव)
दीपक चव्हाण- राष्ट्रवादी- फलटण (सातारा)
तुकाराम काते – शिवसेना- मानखुर्द (मुंबई)
विक्रम काळे- राष्ट्रवादी- औरंगाबाद शिक्षक मतदार संघ
सुधीर पारवे- भाजप – उमरेड (नागपूर)