निर्भीडसत्ता न्यूज –
सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने मायग्रेनच्या दुखण्यावर आराम मिळतो. काही दिवस सकाळच्या वेळी रोज एक सफरचंद खावे.
उन्हाळ्याच्या दिवसात होणारी डोकेदुखी थांबण्यासाठी कलिंगडाचे सरबत प्यावे. फक्त एक ग्लास कलिंगडाचे सरबत दिवसभरातील कामं करण्यासाठी स्फूर्ती देते.
काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. काकडी खाल्ल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. पोटॅशियम, मॅग्नशियम, जीवनसत्त्व ए, बी आणि सी असते. कर्करोग आणि किडनीचे विकार दूर ठेवण्यास काकडी उपयुक्त ठरते.
लसूण खाल्ल्याने रक्तातील इन्सुलीन वाढते. यामुळे मधुमेह कमी होतो.