निर्भीड न्यूज
रहाटणी येथील राजगड, सज्जनगड आणि सिंहगड कॉलनीतील नागरिकांनी स्थापन केलेल्या तिरंगा क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी नाम फौंडेशनला एकतीस हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली. सोमवार (दि.११) मंडळाच्या वतीने नाम फौंडेशनचे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी अमित गोरखे यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, उपाध्यक्ष प्रफुल्ल कोकणे, गोपाळ माळेकर, संतोष जगताप, माऊली कोकणे, अकबर शेख, ज्ञानेश्वर डोके, प्रकाश देशमुख, राजू बोराडे, तानाजी चौगुले, बब्रुवान ढेपे, रामेश्वर गटकळ, ज्योतिबा पाटील, नारायण खामकर, नागनाथ लोंडे, गोविंद वलेकर, नरेंद्र माने, दत्तात्रय जाधव, शांताबाई कोकणे, सरिता जगताप, कांचन डिंबळे, मिनाक्षी भुरे आदि यावेळी उपस्थित होते.
अमित गोरखे म्हणाले कि, नागरिकांनी पाण्याची बचत केली पाहिजे. एक ग्लास पाण्याची किंमत फक्त त्या दुष्काळग्रस्तांनाच माहित आहे. संपूर्ण महाराष्ट्र मदतीसाठी धावून आला आहे. हा निधी तंटामुक्त गावात दिला जातो. आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरातून नाम ला दोन कोटी पेक्षा जास्त निधी दिला गेला आहे.