निर्भीडसत्ता न्यूज –
‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) च्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाच्या विद्यार्थींनीनी वाहतूक पोलिसांना राखी बांधून अनोख्या पद्धतीची ‘राखी पौर्णिमा’ साजरी केली.
रक्षाबंधनाच्या दिवशी रविवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सिग्नल्सवर जे वाहतूक पोलीस कार्यरत होते त्यांना या विद्यार्थींनीनी राखी बांधली.
या उपक्रमात सहभागी विद्यार्थिनींना ‘भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड मॅनेजमेंट डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर, प्रा. विजय फाळके (कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना) यांचे मार्गदर्शन लाभले.