निर्भीडसत्ता न्यूज –
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन करुन राज्यातील मातंग समाजाला भेट द्यावी, अशी मागणी अमित गोरखे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाचा शैक्षणिक, अर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळाची स्थापना केली होती. मात्र, काही भ्रष्ट राज्यकर्त्यांमुळे महामंडळ बंद करण्यात आले. याचा राज्यातील मातंग समाजातील नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त महामंडळाचे पुनरुज्जीवन करुन राज्यातील मातंग समाजाला सरकारने भेट द्यावी, असे गोरखे यांनी म्हटले आहे.