निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवानिमित्त १ ते ५ ऑगस्ट या कालावधीत निगडीतील भक्ती-शक्ती चौक येथे विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १) उद्घाटन होणार आहे.
महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी असतील. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, नगरसेवक शितल शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, अभिषेक बारणे, उत्तम केंदळे, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गणेश क्षीरसागर, मनोज तोरडमल, अमित गोरखे, शिवाजी साळवे, संजय ससाणे, किशोर हातागळे, गणेश साठे, मोहन वाघमारे, भिमा वाघमारे, राजेश आरसुळ, अविनाश कांबीकर, महेश खिलारे, सुनिल भिसे, नितीन घोलप आदी उपस्थित असतील.
१ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा दहा वाजता महापौर काळजे यांच्या हस्ते निगडीतील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण केले जाईल. सकाळी साडेदहा वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबीर, शाहिरी जलसा, सकाळी साडेअकरा वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत मिरवणूक, दुपारी साडेबारा वाजता प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम, दुपारी दोन वाजता गरजला सिंहाचा छावा हा शाहिरी जलसा कार्यक्रम, दुपारी साडेतीन वाजता भव्य बँन्ड स्पर्धा, सायंकाळी सहा वाजता महोत्सवाचे उदघाटन आणि रात्री आठ वाजता महाराष्ट्राचा शाहिरी बाणा कार्यक्रम होईल.
२ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता भव्य ढोल लेझिम स्पर्धा, सकाळी साडेदहा वाजता प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम, दुपारी साडेबारा वाजता महिला बचत गट मेळावा व मार्गदर्शन, दुपारी दोन वाजता महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, सायंकाळी पाच वाजता अण्णा भाऊंच्या साहित्याचे विविध पैलू या विषयावर परिसंवाद, सायंकाळी सात वाजता शांताबाईचा जलवा हा कार्यक्रम होणार आहे. ३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम, दुपारी साडेबारा वाजता जागर रयतेचा हा समाजप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम, दुपारी दोन वाजता मैफील ए सदाबहार हा गीतांचा कार्यक्रम, दुपारी चार वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य व त्यांना आणि त्यांच्या साहित्याला मिळालेला न्याय या विषयावर महाचर्चा, सायंकाळी सात वाजता तुफान आले साहित्याचे हा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम होईल.
४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता अण्णा भाऊंचे लिखाण व अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायक व नायिका या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा तसेच अण्णाभाऊ साठे व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या विषयावर निबंध स्पर्धा, रांगोळी, चित्रकला व नृत्य स्पर्धा, दुपारी एक वाजता सोनेरी पहाट प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम, दुपारी अडीच वाजता समाजप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम, दुपारी चार वाजता जल्लोष मराठमोळया लावण्यांचा कार्यक्रम, सायंकाळी साडेपाच वाजता समाजाची उन्नती, सद्यस्थिती व प्रगतीचे मार्ग या विषयावर परिसंवाद, रात्री आठ वाजता प्रसिद्ध गायक नंदेश उमाप प्रस्तुत संगीतरजनी हा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम, ५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता काव्य कट्टा हा कविसंमेलनाचा कार्यक्रम, दुपारी साडेबारा वाजता वारणेचा वाघ या नाटकाचे आयोजन, दुपारी अडीच वाजता ऑर्केस्ट्रा, सायंकाळी साडेचार वाजता समाजप्रबोधनपर व्याख्यान, सायंकाळी साडेपाच वाजता ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार व लेखक उत्तम बंडू तुपे यांना लोकशाहिर अण्णाभाऊ साठे कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्याचे सामाजिक, न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलिप कांबळे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण होईल. सायंकाळी सात वाजता ऑर्केस्ट्रा म्युझिकल स्टार्स या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे.