नर्मदेतील जनतेवर अन्याय करू नका
निर्भीडसत्ता न्यूज –
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्ताचें संपूर्ण पुनर्वसन झालेशिवाय जलाशय भरू नये यासाठी व इतर मागण्यांसाठी मेधाताई पाटकर यांनी नर्मदा खोऱ्यामधे दि.२७ जुलै पासून जल- सत्याग्रह सुरु केला असून त्याची दाखल प्रशासनाने घ्यावी म्हणून आज महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने मुख्यमंत्री व नायब तहसीलदार संजय भोसले यांना निवेदन दिले .
यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते स्वराज अभियान महाराष्ट्र चे अध्यक्ष मानव कांबळे , विजय निकाळजे , इरफान चौधरी, राजू बिराजदार,साईनाथ खंडीझोड ,प्रकाश साळवे ,धान्यकुमार वास्ते ,कासीम तांबोळी ,दत्ता रुद्रावार ,नागनाथ लोंढे ,ओमप्रकाश मोरया आदी उपस्थित होते.
वास्तविक फेब्रुवारीत मा .सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निर्णयात उर्वरित प्रकल्पग्रस्ताचें पुनर्वसन तीन महिन्यात पूर्ण करावे असे असताना सुमारे ४० हजार कुटुंबाचे पुनर्वसन बाकी ठेऊन प्रशासन जबरदस्तीने कारवाई करत आहे ,महाराष्ट्रात अद्याप ४०० कुटुंबांचे पुनर्वसन होणे बाकी आसतांना १७ जूनला धरणाचे दरवाजे बंद केले आहेत याला विरोध म्हणून महासंघातर्फे मुख्यमंत्री यांना पुढील प्रमाणे मागण्या केल्या आहेत
– धरणाचे दरवाजे उघडण्यात यावेत
– मा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करावे
– विस्थापिताना हटवण्यासाठी बाळाचा वापर बंद करा
– भूमिहीन मच्छीमार,छोटे व्यापारी, यांचेही योग्य पुनर्वसन करा आदी मागण्या केल्या असून वरील मागण्यांचा विचार झाला नाही आणि ४० हजार लोकांना वेठीस धरून अन्याय केला तर महासंघातर्फे लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिला आहे