निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराच्या विरोधात “घंटानाद आंदोलन” करण्यात आले.
पवना धरण १००% भरले असतांनाही प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे व टँकर लॉबीच्या भल्यासाठी एक दिवसाआड पाणी पुरवठा करुन शहरातील नागरिकांना वेठीस धरले जात आहे. प्रशासनास याबाबत वारंवार निवेदने, अर्ज देण्यात आली आहेत. आंदोलने केली आहेत. परंतु अद्यापही नियमित पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. शहरात अनाधिकृत नळकनेक्शन रोजरोस होत आहेत. पाण्याची चोरी होत आहे परंतु त्यांच्याकडे प्रशासन सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहे. बाकीची इतर हास्यास्पद कारणे देऊन कृत्रिम पाणी टंचाई करत आहे. त्यामुळे या झोपलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी आज बुधवार दिनांक ०४ डिसेंबर २०१९ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने “घंटानाद आंदोलन” करण्यात आले.
या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे, नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने, भाऊसाहेब भोईर, महिला अध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर, मंगलाताई कदम, पक्ष प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, प्रविण भालेकर, पंकज भालेकर, मोरेश्वर भोंडवे, विनोद नढे, संतोष कोकणे, मयुर कलाटे,राजू बनसोडे, रोहित (आप्पा) काटे, संजय वाबळे, नगसरेविका अपर्णा डोके, समुनताई पवळे, अनुराधा गोफणे, पौर्णिमा सोनवणे, संगिता ताम्हाणे, प्रज्ञा खानोलकर, उषा काळे, स्वाती (माई) काटे, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष विजय लोखंडे, संगीता कोकणे, निलेश पांढारकर, उत्तम आल्हाट, विशाल काळभोर, शाम जगताप, तुकाराम बजबळकर, जहीर खान, अमोल भोईटे, संजय औसरमल, प्रतिक इंगळे, प्रविण गव्हाणे, यतीन पारेख, संग्राम चव्हाण, पोपट पडवळ, मेघा पवार, सविता खराडे, शिला भोंडवे, विश्रांती पाडाळे, दिपाली देशमुख, किरण देशमुख, बाळासाहेब पिल्लेवार, यशवंत शिंदे, सतीश क्षीरसागर, गोरोबा गुजर, रामेश्वर लाहोटी इत्यादी मान्यवरांसह अनेक नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर आंदोलनात प्रशासनाच्यावतीने पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी निवदेन स्वीकारले व आठ दिवसात पाणी पुरवठा नियमित करण्याचे आश्वासन देण्यात आले. एका आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी दिला