नवी दिल्ली : उज्वला योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या तीन गॅस सिलिंडरची मुदत जून ते सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून, यासाठी 13 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार आहे. 4 कोटी लोकांना याचा फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात यासह अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर या निर्णयांची माहिती देताना म्हणाले की, उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे. 1 जुलैपासून ते 3 महिन्यांसाठी ही मुदत वाढविण्यात आली. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधीही वाढविण्यात आला आहे. आता नोव्हेंबरपर्यंत लोकांना धान्य मिळेल. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत ईपीएफच्या वाट्याला 24 टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली, 72 लाख लोकांना याचा फायदा होईल. त्यांनी सांगितले की ज्या कंपनीत 90 टक्के लोक 15 हजारपेक्षा कमी पगारावर काम करतात. त्यांचा पीएफ सरकारने भरला. अशा 3 लाख 67 हजार उद्योगांना आणि 72 लाख कर्मचार्यांना याचा फायदा झाला आहे.