हवामान तज्ज्ञांचा अंदाज
पुणे : दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला यंदा वरूण राजा खुश करणार असल्याचे दिसत आहे. त्यासाठी यंदा मान्सूनचे आगमन हे लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
महाराष्ट्रासह अनेक राज्ये दुष्काळाने पीडित आहेत. त्यांना यंदा लवकरच दिलासा मिळणार आहे. यावर्षी मान्सूनला चार दिवस लवकर सुरूवात होणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यंदा तापमानात मोठी वाढ झाली आहे. ती मान्सूनच्या पथ्यावर पडणार असल्याने मान्सून चार दिवस लवकर येत आहे. दरवर्षी मान्सून सर्वसाधारणपणे 7 जून रोजी सुरू होतो. यंदा 3 जून रोजी पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. केरळमध्ये तो 26 ते 27 तर 28 ते 29 मे दरम्यान मान्सून महाराष्ट्रात येणार असा अंदाज आहे. मागच्या 3-4 वर्षपासून महाराष्ट्रातील मराठवाड्याने दुष्काळाचे चटके सहन केले आहेत. त्यामुळे यंदा तरी या दुष्काळापासून सुटका होण्यासाठी शेतकरी वरूण राजाकडे साकडे घालत आहे